सातत्याने एखाद्या (शिकलेल्या) स्त्रीची घरातल्या सर्वांकडून होणारी अवहेलना आणि हेटाळणी बघून खरंतर संताप होतो. नुकत्याच ज्या वळणावर ही मालिका येऊन पोहोचली आहे ते पाहता नवरा आणि बायको यांच्यामध्ये संवादाचा प्रचंड अभाव आहे असे दिसते अर्थात हे सगळे पाहून एक प्रकारची निगेटिव्हिटी नैराश्य हे लोकांमध्ये तयार होत असेल.सध्या सुरू असणाऱ्या बऱ्याच चॅनलवरच्या अशा मालिका पाहिल्या की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे थोडस हलकाफुलका वातावरण आणि बाकी सगळे निगेटिव्हिटी. काय दाखवायचं आणि काय नाही हा नक्कीच निर्माते आणि मालिकेचे सदस्य यांनी ठरवायचे असते तसेच पाहायचे की नाही हे प्रेक्षकांनी ठरवायचे असते पण एक माणूस म्हणून विचाराल तर हे अशी अवहेलना नक्कीच बघण्यालायक नाही कुठेतरी सारासार विचार करून हा सगळा प्रपंच बदलायला हवा हे नक्की अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे